Friday, September 25, 2009

Team India....

सध्या आमच्या अंगात क्रिकेट चे वारे शिरले आहे...खर तर गेली ३ वर्ष...म्हणजे भारत वर्ल्ड कप हरल्यापासून अस्मादिकाच्या डोक्यात एक तिडिक बसली होती...पण कालच गैरी किर्स्तेन यांचा टीम इंडिया ला दिलेला सल्ला वाचला अणि क्रिकेट मध्ये आम्हा पुन्हा रस वाटू लागला....

झाला असा की टीम इंडियाच्या रडी खेळासाठी नेहमीप्रमाने प्रत्येकाने आपापले अनाहूत सल्ले द्यायला सुरुवात केलि..त्यात आपले गुरूजी जे की गैरी महाशय यांनी असा सिद्धांत मांडला की टीम इंडिया सगळ्यात जास्त गरज कशाची आहे तर सेक्स ची....झाल..अणि नेहमी प्रमाने आम्ही स्वप्नरंजनात बुडून गेलो....

म्हणजे जस hocky च्या आधी राष्ट्र गीत वाजवले जाते...किव्वा वार्मअप साठी खेळाडू तयार होतात तद्वत टीम इंडिया ड्रेसिंग रूम मध्ये तयार होण्याऐवजी आपापले कपडे काढू लागली आहे...११ खेळाडू अणि त्यांसाठी किमान ११ ललना यांना काही काळ एकांत दिला गेला आहे...प्रत्येकाचे चाहते स्वाक्षरी साठी नाही तर रूम च्या बाहेर काय ऐकू येते का यासाठी कान टवकारून बसले आहेत...अणि मग टीम इंडिया चे एकेक बहाद्दर गडी विजयी मुद्रेने मैच साठी बाहेर पडत आहेत...वाह वा.. अहो टीम इंडिया चे हे असला सौभाग्या पाहून विरोधी टीम ची भावना इतनी अनावर होंएल की ते मैच सोडून आपापल्या (?) बायकांकडे पलायन करतील....टीम इंडिया मैच जिंकेल ती अशी....काय नामी शक्कल आहे....?