Sunday, August 30, 2009

Struggle for Excellence or Existence…..??


The only motive that brought me to US was to excel ethically in my professional life…like we all l also thought initially…I was disappointed with the Indian bureaucratic system, disgusting reservation system and unethical ways that people use to grow in their professions. I had listened to the stories in institutes like NCL (National chemical lab, Pune, where I completed my undergrad project), about how south Indian lobby supports southee’s (with few respected exceptions) and blah blah..!!! I had chosen my profession with some reason and was not willing to leave it upto certain system to decide fate of it.

US then became my dream land. The land of opportunities…!! I didn’t even try GATE or CAT…so possessed I was ; perhaps I might be the first one who was smiling when leaving my dearest ones and the country. But that dream was proved an ephemeral. Soon I reached the US, I realized that I am on my own and nobody has even a little concern about my presence here. One thing was sure in my mind. I didn’t come here to earn money. It was never and will never be my priority in life. I still strongly believe that money is measure of success and not that earning money brings success.

Success has to come thro’ several hardships. I don’t deny that. I did the same thing, worked hard, physically –mentally, on campus- off campus, gathered each and every dollar to pay off my fees, living expenses; consoling myself that these 2 years of hard work will bring me success after my graduation…simply when I will get a decent job. I made it. After few weeks of immense mental stress and endless efforts I managed to get the long awaited so called “dream job”..!!!

But am I really happy at this stage..? Is it really worth of what I am…? Is it like I have something very extra-ordinary thing that lots of other friends of mine doesn’t have at this stage (because of the recession)…a damn job….does it compensate for all I lost here…? Does success means possessing something that others don’t…? Lowering your benchmarks and then boast on achieving it, is a fools business. I lost my very first friends, I lost sole love of my life and more importantly I lost my self consciousness. I did illegal things, knowing-unknowingly I behaved unethical. I did the things for which I can’t justify myself in front of the mirror. This ‘struggle for excellence’ soon changed to ‘struggle for existence’, and I had no idea, I was haunted. It was like going back into our primitive stage of striving for survival with no thinking about its consequences. My regret is for these precious 3 years of my youth I wasted doing this.

This doesn’t mean I am nervous or have lost joy of life. Some people may think I am turning mad or on the way to become yogi. Nothing of that is going to happen soon. I am enjoying my life, I know it’s beautiful. It is just that I have started exploring myself that I didn’t do for last 3 years. And to my wonder, it is miraculous. There was so much into my soul that was popping to come out, And I didn’t had clue about it. So my earnest request is to everyone reading this blog. Be little introvert and find what you really want in your life. Don’t let someone else to decide what success means to you. It is your right to decide your destiny, use that….. Trust me “life is beautiful”..!!! And you just get it once…don’t waste it.

Omkar…

Wednesday, August 19, 2009

नायगारा...एक जिवंत अनुभव...

आयुष्यात काही गोष्टी फक्त ज्याच्या त्याने अनुभवायाच्या असतात....नायगारा ही असाच...सुरुवातीला वाटला होता की नेहमी प्रमाने अमेरिकन लोकांनी उगाच त्याच अति कौतुक केल आहे...फेरी राईडस, रात्रीच्या वेळी अतिभव्य प्रकाश योजना वगैरे...अगदी वरून त्याच अवलोकन करतानाही मला विशेष नवल वाटला नव्हता...कारण डोंगरदर्यातून खळाळत येणारया प्रवाहाची आम्हाला सवय अणि ओढ़....ह्या पोपकोर्न अणि चिप्स खात बघण्याच्या धबधब्याची नवलाई तिथेच विरून जाणार होती...

पण त्या प्रवाहाच्या पायथ्याशी गेलो अणि सगळे अपसमज बाजूला पडले...तो शांत वाटणारा प्रवाह डोक्यावरन पडताना किती भयंकर होतो हे ज्याच तोच जाणे...त्या पाण्यात मी किती वेळ उभा होतो हे माझ मलाच उमजला नाही...एखाद्या रौरवत्या वादळापुढे हतबल व्हावा तसा त्याच्या अजस्त्रपणापुढे मी नतमस्तक झालो...

असीम अनंत विश्वाचे रण,
त्यात हा पृथ्वीचा इवला कण |
घेऊन आडोसा कोणी 'मी' वसें,
क्षुद्रता अहो ही अफाट असें !

पण त्या भावनेत पण एक समाधान आहे...आपल्या सर्वांची क्षुद्र आयुष्य अणि त्यातली क्षूद्र दुःख्खे...त्यांना कवटाळून आपण जगत असतो...पण नायगारा बघताना काही क्षण का होईना आपण स्वतःला विसरून जातो...निसर्गाच्या ह्या उदात्त रुपात आपल्याला सर्व प्रश्नान्ची उत्तरे मिळतात...गाडगे बाबा म्हणायचे..." येकलेच हिन्डा...देवाने ह्ये निसर्गाच पुस्तक लिवालय...ते मस्त वाचीत हिन्डा..." त्या वाक्याचा मतितार्थ आज थोडा थोडा उमगयाला लागला आहे...

खरतर मी गेलो होतो मस्त फोटो काढायला....नविन dSLR च प्रयोग करायला...अगदी wide angle lense वगैरे सर्व अस्त्रे परजुन ..कैमरा पाण्यात भिजू नये म्हणुन protective बैग अशी जय्यत तयारी केली होती...पण पाण्यात उतरलो अणि भानच हरपून गेला....फ़क्त मनः चक्षून्नी बघायची गोष्ट मला तरी कैमेर्यात नाही बंद करता अली..."अनंत हस्ते देता दिवाकराने..किती घेशील दोन करांनी...." अशी अवस्था झाली...

मागच्या वर्षी पाचही जलाशय (Great Lakes) बघण्याचा अभिनव संकल्प सोडला होता...ती परिक्रमा आज पूर्ण झाली...अणि मनातली अनुभूति आणि समाधान अशी शब्दात व्यक्त नाहीच करता येणार...!!!

ॐकार..

Tuesday, August 11, 2009

ओळख स्वतःची...!!!

मागच्या महिन्यात फिलाडेल्फिया च्या ब्रूहन्महाराषट मराठी मन्डळाच्या अधिवेशनाला जाण्याचा योग आला...नाना पाटेकर ची मुलाखत..!!!....नाना अणि प्रवाद यांच विलक्षण सख्य आहे ...त्यामुळे काहीतरी रोक ठोक ऐकायला मिळणार अशी खात्री होतीच...पण नानाला प्रत्यक्षा बोलताना ऐकला अणि मी स्तिमित झालो....जिवनाविषयी फार सरल अणि सोपी दृष्टी लाभलिये या माणसाला...

६० वर्षाचा नाना...पण अगदी लहान मुला इतका निरागस आहे....निरागस म्हणजे भोला किव्वा साधा सोज्वल नाही...वेळ प्रसंगी एखाद्याची गचांडी धरून बदडणारा नाना सर्वांनी पाहिला आहे....खामोशी च शूटिंग जेव्हा आमच्या शाळेजवळ झाला होता तेव्हा तो प्रसंग नानाच्या मारामारी वरुन जास्त गाजला होता....

पण नानाच बोलण फार अंतर्मुख करून गेल मला....स्वतःला स्वतःची ओळख होण..हे फार महत्वाचा...मी कोण आहे हे एकदा स्वतःला कळाल की मग जगाची भीती वाटत नाही अणि त्याची फ़िकीर करायची गरज पण नाही....उगाच नसता बडेजाव अणि उसना अभिनिवेश पाहिजे कशाला...?

आपण कुत्रा आहोत तर कुत्र्या सारखा वागाव...नाहीतर उगाच सशाचा आव आणायाचा अणि कोणी जवळ आला की कडकडून चावा घ्यायचा हे कशाला...? कुत्र्याने चावावा अणि सश्याने लपून बसाव...म्हणजे लोकांना पण ठरवता येता की कोणाच्या किती जवळ जायचा ते....

स्टीव जोब्स म्हणतो.....“...Your time is limited, so don't waste it living someone else's life... Don't be trapped by dogma ;which is living with the results of other people's thinking... Don't let the noise of other's opinions drown out your own inner voice... And most important, have the courage to follow your heart and intuition. They somehow already know what you truly want to become. Everything else is secondary....”

किव्वा अविनाश धर्माधिकारी म्हणतात तस...."..स्वतःला दुसर्याच्या नजरेत , दुसर्याच्या मापदन्डावर...आणि दुसर्याच्या मोजपट्टीवर मोजण हा एक अंतहीन आणी विफल प्रवास आहे ....आपण स्वतःला मोजायचा असता ते स्वतःच्या नजरेत, स्वतःच्या मापदन्डावर... आणी स्वतःच्या मोजपट्टीवर.....हा प्रवासही अंतहीन आहे पण विफल नाही ...!!! "

नानाचा मनस्वी पणा मनाला भिडतो तो याच कारणासाठी....

ॐकार...

Thursday, August 6, 2009

राखी की शादी...

बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे आमच्या बालमनावर वाईट परिणाम होण्याच्या काळात अनिल कपूर अणि अमृता सिंह यांचा चित्रपट आला होता..."चमेली की शादी..." (१९८६)...इतका सभ्य चित्रपट की त्या अमृता च्या वाईट मनावर बाल परिणाम झालेत की काय अशी शंका यावी...त्यानंतर सूरज बड़जात्या ने लग्न सार्वजनिक केलि ते हम आपके है कौन ने...एक लग्न कमी पडला म्हणुन की काय त्याने हम ६०/६० है असाही चित्रपट काढला....बाकी पुराणात लग्नांची वर्णने नाहीत असा नाही.... सीता स्वयंवर...द्रोपदी स्वयंवर याने तर इतिहास घडवला ते आपण जाणतोच....पण त्या सर्व पतिव्रता होत्या...ह्या सर्वांचा वारसा कलियुगात कोण चालवणार...? असा प्रश्न आम्हाला खुप दिवासान्पासून पडला होताच....कालच त्याचे याची देही याची डोळा उत्तर मिळाले अणि आमचा जन्म सार्थकी लागला...चि.सौ.कां राखी सावंत...

"सामर्थ्य आहे मीडिया चे ..जो जो वापरिल तयाचे |...परन्तु तिथे रियलिटी शो चे ...अधिष्ठान पाहिजे || "...अस रामदास स्वामी म्हणुन गेले आहेत....म्हनुनच सध्याच्या जगात रियलिटी शो ने जो हैदोस घातला आहे तो कलियुगाचा महिमा आहे अशी जर तुमची समजूत असेल तर ती सपशेल चुक आहे...याउलट आम्हाला तर सत्ययुग परत येण्याची शुभचिन्हे दिसू लागली आहेत....आता हेच बघा... राखी पुर्वाश्रमिची कोण...? वैषयिक मुलगी (आयटम गर्ल)....!!! लोकांच्या अवहेलनेला अणि वासनेला बळी पडलेली मुलगी आता सन्मानाने समाजात राहू बघते अणि तिला हजारो लाखो लोक लग्नाचे प्रस्ताव देतात...हा समाजाचा किती मोठेपणा...? फूले-आगरकर ह्यांनी " ह्याच साथी केला होता अट्टहास .." नाही का...? सत्ययुग अवतरले म्हणतात ते हेच ....

आता आपली 'राखी'....पूर्वीच्या सर्व बॉयफ्रेंड ना राखी बांधणार का..? अस प्रश्न फ़क्त नतध्रषट लोकच विचारू शकतात....आम्हाला मात्र तिचे फार कौतुक वाटते...अणि आमच्या कुटुम्बालाही..!! "अग्गोबाई ..!!! आता हिची मंगलागौर पण दाखवणार का...?" अस स्त्री सुलभ प्रश्न आमच्या भाबड्या आजीने विचारला होता...श्रावण आलाय ना...? नाही इतपत ठीक आहे...पण त्यानन्तर डोहाळ जेवण पण दाखवणार..? अणि मग काय जाहिरातींना काय पूर आल्याशिवाय राहणार आहे का...? "राखिच्या ह्या प्रसूति वेदनेचे प्रायोजक होते...अमके अमके."..ते " this 'बाळन्त शोपा ' is brought to you by...तमके तमके"...असाही कानावर येवू शकता...

कसा आहे की जोपर्यन्त आपण अक्कल गहाण टाकुन असे कार्यक्रम बघत राहणार ...तो पर्यन्त हे चालूच राहणार...अहो जेव्हा विकल जाता तेव्हाच पेरला जाता....हे कळनारा शेतकरी हुशार आहे...पण आपण नाही....

ॐकार...